Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पायलटने केला निष्काळजीपणा, झाली हेलिकॉप्टर दुर्घटना

पायलटने केला निष्काळजीपणा, झाली हेलिकॉप्टर दुर्घटना
, शुक्रवार, 16 जून 2017 (12:36 IST)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरची दुर्घटना पायलटच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा प्राथमिक अहवाल एएआयबीने दिला आहे.त्या दिवशी तापमान जास्त होतं. पण हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन होतं हे समजण्यात पायलटची चूक झाली. शिवाय उष्ण वातावरणात हेलिकॉप्टरला उड्डाण घेणं कठीण असतं. त्यामुळे अशा परिस्थितीही जास्त वजन असल्याने त्याने उड्डाण करायला टाळायला हवं होतं, परंतु पायलटने हे नियम पाळले नाहीत, असं एएआयबीने अहवालात म्हटलं आहे. हेलिपॅडच्या आजूबाजूच्या परिसरात वीजेचे खांब, तार यांसारख्या अडथळा ठरतील अशा वस्तू नसाव्यात. मात्र हा नियम पाळला नाही. लातूरमध्ये मागील महिन्यात 25 मे रोजी उड्डाणानंतर मिनिटभराच्या आतच हेलिकॉप्टर कोसळलं.  मुख्यमंत्र्यांसह हेलिकॉप्टरमधील सगळे जण या अपघातातून थोडक्यात बचावले.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

GST: एक जुलैपासून स्वस्त होती या वस्तू...