Publish Date: Thu, 23 Jan 2025 (08:48 IST)
Updated Date: Thu, 23 Jan 2025 (08:51 IST)
Jalgaon Railway Accident News: महाराष्ट्रातील जळगाव येथे झालेल्या रेल्वे अपघातात 12 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघाताने सर्वांनाच धक्का बसला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघातावर दुःख व्यक्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यात पुष्पक एक्सप्रेस ट्रेनमध्ये आग लागल्याच्या अफवेमुळे अनेक प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. दरम्यान, दुसऱ्या बाजूने येणाऱ्या एका ट्रेनने या प्रवाशांना चिरडले. आता सरकारने मृत आणि जखमींना भरपाई जाहीर केली आहे.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
जळगाव रेल्वे अपघाताबाबत पंतप्रधान मोदींनी एक्स वर पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले- "महाराष्ट्रातील जळगाव येथे रेल्वे रुळांवर झालेल्या दुर्दैवी अपघाताने मी दुःखी आहे. मी शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि सर्व जखमींना लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करतो.
Edited By- Dhanashri Naik