Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

योग्य काळजी न घेण्यात आल्याने रायगडवर 9 हजार झाडे जळाली

योग्य काळजी न घेण्यात आल्याने  रायगडवर 9 हजार झाडे जळाली
, शुक्रवार, 17 मार्च 2017 (16:12 IST)
रायगड किल्ल्यावरील जवळपास 9 हजार झाडांचा पाण्याअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनीच ही धक्कादायक माहिती दिली आहे.  जुलै 2016 मध्ये जवळपास 16 हजार औषधी वृक्षांची जलसंधारण योजनेअंतर्गत ही लागवड करण्यात आली होती. मात्र त्यांची योग्य काळजी न घेण्यात आल्याने या झाडांचा मृत्यू झाला आहे.  जुलै 2016 मध्ये जवळपास 16 हजार औषधी वृक्षांची जलसंधारण योजनेअंतर्गत ही लागवड करण्यात आली होती. रोजगार हमी योजनेअंतर्गत झाडांना पाणी देण्यासाठी मजूर लावण्यात आले होते. मात्र, अपुऱ्या मजुरीअभावी त्यांनी कामाकडे पाठ फिरवली. यानंतर स्थानिक स्वयंसेवी संस्थांकडूनही मदत घेण्यात आली. मात्र, त्यांनीही सहकार्य न केले नाही. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ट्रम्प यांचा सुधारित प्रवेशबंदी आदेशा न्यायालयाकडून रद्द