छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अरबी समुद्रात बांधणं ही जनतेची होत असलेलीं आणि दिसत असलेली शुद्ध फसवणूक आहे अशी जहरी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे . तर इतर अनेक गोष्टींवर त्यांनी सरकारवर टीका केली आहे. राज ठाकरे हे प्रमुख अतिथी म्हणून ‘शोध मराठी मनाचा’ या 14 व्या जागतिक मराठी संमेलनात ते बोलत होते.
जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. मुंबई ते दिल्ली सर्वाधिक विमान प्रवास होत असताना केवळ अहमदाबादलाच बुलेट ट्रेन का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा मुंबईला तोडण्याचा डाव असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
राज यांनी आपल्या शैलीत नवीन गुलाबी नोटेचा समाचार घेतला आहे. राज म्हणाले की “नवीन 2 हजाराची नोट मला एका मित्राने दाखवली, तेव्हा लहानपणी खेळायचो ना ‘व्यापार’ त्यातली ती नोट वाटली. नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोदींची बॉडी लॅंग्वेज बघा. चुकलेली स्पष्ट दिसते. नोटाबंदीच्या निर्णयानंतर 60 निर्णय बदलले, हे काय तयारीनिशी घेतलेल्या निर्णयाचं लक्षण नव्हे.”, अशी टीका राज ठाकरेंनी केली. शिवाय, येत्या काळात नोटाबंदीवर सविस्तर बोलणार असल्याचेही राज ठाकरेंनी सांगितले आहे.