Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता मंत्रालय ‘आत्महत्यालय’ बनले आहे : राज ठाकरे

आता मंत्रालय ‘आत्महत्यालय’ बनले आहे :  राज ठाकरे
, गुरूवार, 8 फेब्रुवारी 2018 (09:47 IST)

निवडणूक प्रचारात भाजप नेते आमचे सरकार काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारपेक्षा वेगळे असेल, असे  सांगत होते. खरेच हे सरकार आघाडी सरकारपेक्षा वेगळे आहे. भाजप सरकारच्या काळात मंत्रालयाचे ‘आत्महत्यालय’ बनले आहे, अशी  टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर  पुन्हा एकदा एका तरुणाने मंत्रालयाबाहेर अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. शेतकरी आपल्या शेतात आत्महत्या करत आहेत आहेत आणि मंत्रालयाच्या दारातही आत्महत्येसाठी येत आहेत. गेल्या तीन वर्षांत मंत्रालयाच्या दारात आत्महत्या करण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेतल्यास भाजप सरकार काँग्रेसपेक्षा कितीतरी भयानक म्हणावे लागेल, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशीद प्रकरणी आजपासून सुनावणी