Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संजय राऊतांचं लक्ष मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर : नारायण राणे

संजय राऊतांचं लक्ष मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर : नारायण राणे
, बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (16:32 IST)
'संजय राऊत यांची केविलवाणी परिस्थिती झाली होती. त्यांना पत्रकार परिषदेत एवढा घाम का फुटला होता?
 
मर्दाला आपण मर्द आहोत हे सांगायची गरज का पडते? संजय राऊत यांना काल घाम का फुटला हे मी सांगणार', अशी सुरुवात करत नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेतून राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. संजय राऊतांना इतके दिवस शिवसेना भवन कसं आठवलं नाही असा प्रश्नही त्यांनी विचारला.
 
"सतत आपण मर्द आहोत हे सांगण्याची गरज मर्दाला पडत नाही. जो घाबरलेला असतो तोच मी घाबरलेलो नाही असं सांगत असतो."
 
संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत उच्चारलेल्या अपशब्दांवरुनही राणे यांनी त्यांच्यावर टीका केली.
 
"संजय राऊत यांची मार्मिकमधून हकालपट्टी झाली. त्यानंतर ते लोकप्रभाला गेले. लोकप्रभामध्ये त्यांनी पराक्रम केले. लोकप्रभात असताना माननीय बाळासाहेबांविरुद्ध अनेक लेख लिहिले." असंही नारायण राणे म्हणाले. लोकप्रभामध्ये बाळासाहेब ठाकरेंवर टीका करणं त्यांनी सोडलं नव्हतं असं राणे म्हणाले.
 
नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्याबद्दल बाळासाहेब ठाकरे यांनी काय उद्गार काढले होते याचाही दाखला दिला.
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संजय राऊत पत्रकार असताना टीका केली होती हे सांगण्यासाठी राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे उद्गार वाचून दाखवले.
 
प्रवीण राणे यांची ईडीने चौकशी केल्यामुळे संजय राऊत यांनी काल थयथय़ाट केला असं नारायण राणे यांनी सांगितलं.
 
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईतल्या शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने भाजप-शिवसेना संघर्ष नव्याने अधोरेखित झाला आहे.
 
संजय राऊतांनी तब्बल तासभर चाललेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. यामध्ये किरीट सोमय्या लक्ष्यस्थानी होते. केंद्रीय यंत्रणांचा कसा गैरवापर केला जातो यासंदर्भात त्यांनी भाष्य केलं.
 
पीएमसी बँक घोटाळ्यातील पैसे आम्ही वापरतोय हा आरोप केला. राकेश वाधवा हे यातील प्रमुख आरोपी आहेत. वाधवा यांच्या अकाऊंटमधून भाजपला 20 कोटी रुपये गेले आहेत. निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कोणाची आहे? ही कंपनी किरीट सोमय्यांची आहे. नील सोमय्याची आहे. आणि त्यांचा भागीदार राकेश वाधवा आहे. हे मी पुराव्यासहीत सांगत आहे. राकेश वाधवानशी यांचा आर्थिक संबंध आहे.
 
वसईला जमीन घेतली. एक सात कोटीला जमीन घेतली. यावर एक कंपनी सुरू केली. याचा डायरेक्टर नील सोमय्या आहे. Environment clearance नाही. आदित्य ठाकरे यांना आवाहन करतो की यात तात्काळ लक्ष घ्या, परवाने रद्द करा आणि या प्रकरणात नील सोमय्याला अटक करा.
 
पीएमसी बँक प्रकरणातील तपास ईडी करत आहे. हे सगळे डॉक्यूमेंट ईडीकडे मी तीन वेळा पाठवले आहेत. ईडीचा भ्रष्टाचार एवढा आहे की हे सगळे वसुली एजंट बनले आहेत. मी शिवसैनिक आहे. संघर्ष करेन .
 
फडणवीसांचा आणखी एक फ्रंट मॅन आहे. मोहित कंबोजने पत्रा चाळीत स्वत: मोहित कंबोजने जमीन विकत घेतली आहे.
 
साडेतीन नेते कोण हे उद्यापासून कळेल. अर्धा कोण, पाऊण कोण लवकरच कळेल असं राऊत यांनी सांगितलं.
 
अनिल परब, आनंदराव अडसूळ यांच्यासारख्या आमच्या नेत्यावर कारवाई करत आहेत, केंद्रीय तपास यंत्रणांचा गौरवापर सुरू आहे. खोटे आरोप केले जातात किंवा बदनाम केलं जातं. तुम्ही सरंडर व्हा नाहीतर कारवाई होईल असा दबाव टाकला जातो. बहुमत असताना भाजप नेते सरकार पाडण्याच्या तारखा का देतात?
 
राऊत पुढे म्हणाले, 170 आमदारांचं बहुमत कसं पायदळी तुडवू शकता? असं मी म्हटलं. तुम्ही मदत केली नाहीत तर तुम्हाला टाईट केलं जाईल असं सांगण्यात आलं. ठाकरे सरकारला धक्ता पोहचेल असं कोणतंही कृत्य आमच्याकडून होणार नाही. मी नावं आता सांगणार नाही पण भविष्यात जाहीर करू.
 
तुमचं सरकार आलं नाही म्हणून ईडीचा वापर करून हे करता? बाळासाहेबांनी आम्हाला गुडघे टेकायला शिकवलं नाही. मी नाही म्हणालो तेव्हापासून माझे निकटवर्तीय, नातेवाईकांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. माझी मुलं, नातेवाईक यांना बदनाम करण्यास सुरुवात केली", असं राऊत यांनी सांगितलं.
 
"महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे, बाहेरचे लोक येऊन आमच्या घरी येणार, बायका मुलींवर दबाव आणणार. हे असं राजकारण कधी झालं नाही",
 
राऊत म्हणाले, "ठाकरे कुटुंबियांनी अलिबागजवळ 19 बंगले बांधल्याचा आरोप मुलुंडच्या दलालाने केला आहे. माझं त्या दलालाला आव्हान आहे कधीही सांगा आपण बसेस करू आणि त्या बंगल्यावर पिकनिक काढू. तिकडे बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन. बंगले दिसले नाही तर त्या दलालाला जोड्याने मारू. 19 बंगले कुठे आहेत?
 
2024 नंतर काय करायचं ते बघू, आमच्या मुलीच्या लग्नाच्या हिशेबालाही लागले. फूलवाले, फटाके, मेहंदीवाल्याकडेही गेले. हे ईडीचं काम आहे का? असा प्रश्न राऊत यांनी केला.
 
आमच्या घरात तुम्ही शिरता, मुलांच्या कामाच्या ठिकाणी, दुकानात शिरताय. जिथे जायचंय तिथे जा पण टक्कर शिवसेनेशी आहे हे लक्षात घ्या असं राऊत म्हणाले.
 
सगळ्यात मोठा घोटाळा महाआयटीमध्ये झाला, 25 हजार कोटींचा घोटाळा आहे. निविदा न काढता टेंडर कसे मिळाले. अमोल काळे, धवांगळे कोण आहेत? मनी ट्रांसफर कसे झालेत ते सगळं सांगणार. तुम्ही शिवसेनेशी, महाराष्ट्राशी पंगा घेतला आहे.
 
महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र. महाराष्ट्र, झारखंड, बंगालचं सरकार पाडण्याचं कारस्थान सुरू आहे. त्यासाठी ईडी, सीबीआयचा वापर सुरू आहे.
 
मोदी, शाहांना विचारायचे आहे की हीच तुमची लोकशाही आहे का? मी अमित शहांना कॉल केला होती. मी तुमचा आदर करतो पण हे चालू असलेलं बरं नाही, तुम्ही मला टॉर्चर करा पण माझ्या निकटवर्तीयांना लक्ष्य करू नका.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना लसीकरणाने पत्ता सांगितला, तीन वर्षांपासून जाधपूरमधील फरार जोडपे पोलिसांना सापडले नाहीत