Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता भाजप संवादयात्रा काढणार : मुख्यमंत्री

आता भाजप संवादयात्रा काढणार  : मुख्यमंत्री
, गुरूवार, 27 एप्रिल 2017 (17:08 IST)
आता भाजपकडून संवादयात्रा काढली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. आम्ही राज्यातल्या 25 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहचू, त्यांच्या समस्या जाणून घेऊ आणि त्यांना सरकारी योजनांची माहिती देऊ, शिवाय यासाठी आम्ही एसी बसमध्ये जाणार नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. आमचे आमदार, खासदार आणि सर्व पदाधिकारी शेतकऱ्यांशी शिवारावर जाऊन संवाद साधतील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. पिंपरीत भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचा समारोप झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
 
शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला जे जबाबदार आहेत, ते संघर्षयात्रा काढत आहेत. केवळ संघर्ष नाव दिल्याने संघर्ष होत नाही, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बिल नाही तरी रुग्णाला डिस्चार्ज दिलाच पाहिजे - कोर्ट