Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय!

eknath shinde
, मंगळवार, 16 मे 2023 (10:10 IST)
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेकरिता जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून 5000 विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. 

येत्या 25 जून ते 5 जुलै 2023 या दरम्यान वारकऱ्यांसाठी विशेष गाड्या धावणार आहे. माऊलीच्या वाखरी येथे रिंगण सोहळ्यासाठी ज्यादाच्या बसेस उपलब्ध करून देणार आहे. 
 
पंढरपूर यात्रेसाठी राज्यातून आणि दूरवरून भाविक आणि वारकरी  येतात त्यांची गैरसोय  होऊ नये या साठी एसटीच्या अतिरिक्त बसेस सोडणार आहे. प्रवाशांचा सोयी साठी पंढरपूरच्या चंद्रभागा, पांडुरंग आयटीआय कॉलेज , विठ्ठल कारखाना आणि भीमा या ठिकाणी तात्पुरती  बस स्थानक उभारणार आहे.या बस स्थानकात सुलभ शौचालय, पिण्याचे पाणी, चौकशी कक्ष, संगणकीय आरक्षण केंद्र, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी सुविधा देण्यात येणार आहे. यात्रेसाठी सुमारे 5000 गाड्या सोडण्याचे नियोजन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.आषाढी यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा विभागातून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.  
 
Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लखनौ मध्ये अर्जुन तेंडुलकरला कुत्रा चावला, ट्विटरवर शेअर करून माहिती दिली