Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तर त्यांनी आरपीआयमध्ये यायला हवं होतं : आठवले

तर त्यांनी आरपीआयमध्ये यायला हवं होतं : आठवले
, शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020 (08:04 IST)
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत जाऊन चूक केली, त्यांना पक्षच बदलायचा होता तर त्यांनी आरपीआयमध्ये यायला हवं होतं असं वक्तव्य आरपीआयचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. बारामती तालुक्यातील कऱ्हावागज या ठिकाणी त्यांनी पुराने नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली.
 
“एकनाथ खडसे हे आमदार नाहीत. त्यांना तिथे आमदारकी मिळण्याची शक्यता आहे तसंच त्यांना मंत्रिपदही मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्यांनी राष्ट्रवादीत जायला नको होतं. त्यांना पक्षच बदलायचा होता तर त्यांनी आरपीआयमध्ये यायला हवं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन त्यांनी चूक केली”.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुन्हा 'असे' घडू नये म्हणून महत्वाचा निर्णय घेतला