Publish Date: Mon, 06 Jan 2025 (16:07 IST)
Updated Date: Mon, 06 Jan 2025 (16:11 IST)
सत्तेत आल्यावर महाराष्ट्राचे नवे मंत्री वादग्रस्त वक्तव्यांनी अडकले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शिर्डी बद्दल वादग्रस्त विधान केले आहे. सुजय पाटील यांनी शिर्डीच्या साईबाबांच्या भक्तांना भिकारी म्हटले आहे. या विधानामुळे जनतेत नाराजी पसरली आहे.
शिर्डीत एका कार्यक्रमाला संबोधित करताना सुजय म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व भिकारी शिर्डीत जमा झाले आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे फडणवीस सरकार मध्ये महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आहे ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहे.
सुजय पाटील यांनी शिर्डीतील भंडारा विषयी बोलताना म्हणाले, शिर्डी साई भंडारामध्ये संपूर्ण देश मोफत प्रसाद ग्रहण करत आहे. भाविकांकडून जेवणासाठी 25 रुपये घ्यावे आणि हे पैसे मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करावे असे ते म्हणाले.
संस्थेकडे शिल्लक असलेला पैसा शिर्डीतील स्थानिक रहिवाशांच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करावा. संपूर्ण देश इथे फुकटात खातो. सगळे भिकारी इथे जमले आहे हे योग्य नाही. मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे. या साठी शिर्डीसंस्थानने विचार करायला पाहिजे. सुजय विखे पाटील हे व्यवसायाने न्यूरोसर्जन असून डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे प्रमुख आहे.