Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सरकारनं स्थानिकांना विश्वासात घेतलं नाही; जयंत पाटलांचा आरोप

Jayant Patil
, शनिवार, 6 मे 2023 (21:10 IST)
बारसू रिफायनरी वादावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. लोकांनी विश्वासात घेऊन काम करणं गरजेचं होतं. मात्र ते झालं नाही, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.
 
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, लोकांची समजूत घालणं आणि लोकांना विश्वासात घेणं हे विकास मार्गाचं पहिलं पाऊल आहे.ते टाळून सरकार रेटारेटी करत असेल तर प्रश्न तयार होतात. यातून स्थानिक लोकांना प्रकल्प आपल्या विरोधात आहे असं वाटतं. एवढ तारतम्य सरकारनं ठेवण आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.
 


Edited By-Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विनाशकारी प्रकल्प गुजरातला द्या आणि लोकांच्या हिताचे प्रकल्प महाराष्ट्राला द्या-उध्दव ठाकरे