Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुढचे दोन ते तीन दिवस पुन्हा एकदा थंडी जाणवणार

पुढचे दोन ते तीन दिवस पुन्हा एकदा थंडी जाणवणार
, शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (15:46 IST)
मुंबईतील कमाल तापमान चार अंशाने कमी झाल आहे. गेल्या शुक्रवारपासून मुंबई शहर आणि उपनगरातील कमाल तापमानात सहा अंशाची वाढ झाली होती मात्र पुन्हा एकदा गुरुवारी तीन ते चार अंशाची घट नोंदविण्यात आली.
 
राज्यात येत्या  2 ते 3 दिवसात हिवाळा जाणवण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याचा काही भागा किमान तापमानात घट होणार आहे. हवामान विभागाने यासंदर्भा अंदाज वर्तवला आहे.पुढच्या दोन ते तीन दिवसात पुन्हा एकदा थंडी जाणवणार आहे. मुंबईतील कमाल तापमान चार अंशाने कमी झालंय. 
 
या आठवडय़ात तापमानात वाढ होण्याची शक्यता नसून, सरासरीपेक्षा एक ते दोन अंश तापमान कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविले आहे. त्यामुळे मुंबईकरांना मध्येच जाणवत असलेला उष्मा थोडा कमी होण्याची शक्यता आहे. तर पुण्यातही निचांकी तापमान आहे.सध्या राज्यात मध्येच थंडी, मध्येच गरम असे वातावरण आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वीजदरवाढ आणि वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर भाजपकडून राज्यभरात टाळाठोक आंदोलन