Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हे काय नवीन, सांगली, मिरज शहरात वटवाघळांची संख्या वाढली

हे काय नवीन, सांगली, मिरज शहरात वटवाघळांची संख्या वाढली
, शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020 (16:30 IST)
सांगली, मिरज शहरात वटवाघळांची संख्या वाढली आहे. आता सर्रास शहरातील झाडांना लटकलेली दिसू लागली आहेत. सांगलीतील आयर्विन ब्रिज जवळ आणि मिरजेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानमधील झाडांवर या वटवाघळांनी आपल ठाण मांडले आहे. एकेका झाडाला शेकडोंच्या संख्येने ही वटवाघळे लटकलेली दिसून येत आहेत. तसेच सांगली शहरापासून जवळ असलेल्या बुधगावमध्येही वटवाघळे आढळून आली आहेत. 
 
मिरजेलगत आणि कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या अर्जुनवाड येथेही वटवाघळांची संख्या मोठी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात २०१९ सालात आलेल्या महापूरामुळे अर्जुनवाड येथील वटवाघळांनी आपला मोर्चा मिरजेकडे वळविला असून आता त्यांनी उद्यानातील झाडावर ठाण मांडले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज ठाकरे यांचा फोन आला, खुद्द शरद पवार यांनीच दिली माहिती