Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सरकार आणि जनता बेफिकीर राहिल्यानेच कोरोनाची दुसरी लाट'- मोहन भागवत

सरकार आणि जनता बेफिकीर राहिल्यानेच कोरोनाची दुसरी लाट'- मोहन भागवत
, रविवार, 16 मे 2021 (10:18 IST)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जनता आणि सरकार जबाबदार असल्याचं सांगत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पहिल्या लाटेचा यशस्वी सामना केल्यानंतर सरकार आणि लोक बेफिकिर झाले असं मोहन भागवत म्हणाले.
पुण्यात 'पॉझिटिव्ह अनलिमिटेड' या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, 'आता मात्र लोकांना पॉझिटिव्ह राहूनच या संकटाला तोंड देणं गरजेचं आहे. कोव्हिड निगेटिव्ह राहण्यासाठी सावधान रहावं लागणार आहे. तसंच या परिस्थितीत तर्कहीन वक्तव्यं टाळायला हवीत. ही परीक्षेची वेळ असून सर्वांनी एकजूट रहायला हवं. एक टीम म्हणून काम करायला हवं.'
तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू असताना त्याला घाबरून न जाता आपण स्वत:ला तयार केलं पाहिजे असंही मोहन भागवत म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस करावे- नाना पटोले