Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चौकशीत जे काही समोर येईल, त्यानंतर राज्यशासन निर्णय घेणार : अनिल देशमुख

चौकशीत जे काही समोर येईल, त्यानंतर राज्यशासन निर्णय घेणार : अनिल देशमुख
, सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (15:54 IST)
“कुणाच्या दबावाचा प्रश्नच नाही, संजय राठोडबाबत नियमानुसार चौकशी होणार, सत्य बाहेर येणार. चौकशीत जे काही समोर येईल, त्यानंतर राज्यशासन निर्णय घेणार आहे.” असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारपरिषदेत सांगितलं.
 
यावेळी अनिल देशमुख म्हणाले, “या संदर्भात अगोदरच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की, नियमानुसारच चौकशी होणार आहे. विरोधीपक्ष ज्या पद्धतीचे आरोप करत आहेत, त्या आरोपात काही तथ्य नाही. पोलीस व्यवस्थित तपास करत आहेत. संजय राठोड कुठं आहेत? हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मी गृहखात्याचा मंत्री म्हणून सांगतो की, नियमानुसार चौकशी व कारवाई होणार आहे. जे काही सत्य असेल ते महाराष्ट्रा समोर येईल. एकदा संपूर्ण चौकशीचा अहवाल समोर आल्यानंतर, वस्तूस्थितीसमोर आल्यानंतर राज्यशासन निर्णय घेईल. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ठाकरे सरकार आल्यापासून झुंडशाही बळावली : अतुल भातखळकर