Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात अजूनही 'इतका' वीज पुरवठा खंडीत

राज्यात अजूनही 'इतका' वीज पुरवठा खंडीत
, सोमवार, 26 जुलै 2021 (23:17 IST)
मुसळधार पावसामुळे राज्यातील १९२७ गावे व शहरातील ९ लाख ६० हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला असून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भर पावसात व पूरात साडेसहा लाख ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे.
 
अतिवृष्टीमुळे महावितरण व महापारेषणच्या कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील वीज यंत्रणेचे अतोनात नुकसान झाले असून महाड, नागोठणे व पेण येथील नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत हे या परिसराचा दौरा करणार आहेत. पावसामुळे प्रभावित क्षेत्रातील एकूण १४ हजार ७३७ रोहित्रे बंद पडली होती.त्यापैकी ९ हजार २६२ रोहित्रे सुरू करण्यात यश आले आहे. बंद झालेल्या ४७४ वीज वाहिन्यांपैकी २६८ वीज वाहिन्या चालू करण्यात आलेल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

JEE Advanced 2021 Admission Date, जेईई प्रगत परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी घेण्यात येईल : धर्मेंद्र प्रधान