Publish Date: Sun, 13 Sep 2020 (08:56 IST)
Updated Date: Sun, 13 Sep 2020 (08:58 IST)
“महाराष्ट्रात राज्यपुरस्कृत दहशतवादाची अवस्था निर्माण झाली आहे. मी कालच ट्विटद्वारे उद्धव ठाकरेंना हा गुंडाराज थांबवण्याचे आवाहन केलं आहे. निवृत्त नौदल अधिकाऱ्याला अशा प्रकारे मारहाण करणं आणि माध्यमांनी दबाव बनवल्यानंतर ६ लोकांना अटक करणं आणि दहाच मिनिटांत सोडून देणं हे चुकीचं आहे. जर अशा प्रकारे गोष्टी होत असतील तर अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात यापूर्वी कधीही झालं नव्हतं.” असं विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल आहे. माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण प्रकरणावर ते बिहारमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाराष्ट्रात खऱचं काश्मीरसारखं वातावरण होत आहे का? या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्र हे खूपच पुढारलेलं राज्य आहे. तिथली जनता सुज्ञ आहे, त्यामुळे तिथे काश्मीरसारखी वैगरे स्थिती निर्माण होणार नाही.”