Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ना. थोरात म्हणतात; शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कृषी विधेयक आणू !

ना. थोरात म्हणतात; शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कृषी विधेयक आणू !
, गुरूवार, 10 जून 2021 (08:13 IST)
अहमदनगर  :- केंद्र सरकारचे कृषी कायदे हे शेतकरी विरोधी, व्यापारी वृत्तीचे समर्थन करणारे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक महाराष्ट्र सरकार आणणार असल्याची घोषणा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
 
केंद्र सरकारने सुधारणेच्या नावाखाली आणलेले काळे कृषी कायदे शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे आहेत. साध्या पॅन कार्ड वर कुठलाही व्यापारी शेतकऱ्याचा माल विकत घेऊ शकतो,
 
यात जर फसवणूक झाली तर जबाबदारी कोण घेणार? या सर्वच गोष्टींचा विचार कृषी सुधारणा विधेयक तयार करताना आमच्या सरकारने केला आहे, असेहवी ना. थोरात म्हणाले.
 
शरद पवार यांचे या क्षेत्रातील योगदान मोठे आहे. दहा वर्षाहून अधिक काळ त्यांनी देशाचा कृषी विभाग सांभाळलेला आहे. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.
 
राज्यसरकारने सुचविलेल्या सुधारणांवर पवार साहेबांनी समाधान व्यक्त केले आणि अधिकच्या सूचनाही केल्या, अशी माहिती थोरातांनी दिली आहे.
 
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे, कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या शिष्टमंडळाने
 
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी राज्याच्या कृषी सुधारणा विधेयकावर सुमारे चर्चा केली. यानंतर बाळासाहेब थोरातांनी हि घोषणा केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मद्याच्या नशेत स्वतःला पेटवून घेतले, उपचारा अगोदरच मृत्यू