Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लग्नाच्या वऱ्हाडावर काळाची झडप, 5 मृत्युमुखी तर अनेक जखमी

लग्नाच्या वऱ्हाडावर काळाची झडप, 5 मृत्युमुखी तर अनेक जखमी
, सोमवार, 31 जानेवारी 2022 (09:48 IST)
लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडावर काळाने झडप घातली .या अपघातात 5 जण दगावले. औरंगाबाद येथील वैजापूरजवळ शिवराई फाट्याजवळ दोन आयशरचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले आहे. 
जालनातील अंबड तालुक्यातून हे वऱ्हाड नाशिकला जात असताना पहाटे तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला तर 23 हुन जास्त लोक जखमी झाले आहेत. जखमींना नाशिक आणि औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मृत झालेल्या पाच जणांमध्ये दोन मुलांचा समावेश आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बजेट 2022 : बजेट म्हणजे काय? अर्थसंकल्पात काय काय असतं?