Publish Date: Sun, 13 Oct 2024 (14:50 IST)
Updated Date: Sun, 13 Oct 2024 (14:54 IST)
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, मुंबई हे देशातील असे शहर आहे ज्या ठिकाणी दोन पोलीस आयुक्त असो किंवा पाच असो. कोणतीही अडचण नाही पण कायदा आणि सुव्यवस्थेचे काय? राज्यात हत्या केली जात आहे. महिला आणि मुली सुरक्षित नाही.ही संपूर्ण गृहमंत्र्यालयाची जबाबदारी आहे.
त्यांनी फक्त मोठमोठे होर्डिंग लावले. राजकारणी म्हणून सत्तेत राहण्याची तुमची लायकी नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत ते म्हणाले, फडणवीस म्हणतात, कुत्राही मेला तर विरोधक राजीनामा मागतील. तुम्ही जनतेला काय समजता.
मुंबई पोलिसांनी सांगितले की, लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या एका कथित सदस्याने महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारलेल्या सोशल मीडिया पोस्टची सत्यता तपासत आहे.
बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री मुंबईतील वांद्रे भागातील खेर नगर येथील आमदार आणि त्यांचे सुपुत्र झिशान सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला. त्यात बाबा यांचा मृत्यू झाला.या प्रकरणावर विरोधकांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहे.
सिद्दीकी यांचा मृतदेह सकाळी वांद्रे येथील लीलावती रुग्णालयातून पोस्टमार्टमसाठी विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदनानंतर, मृतदेह वांद्रे येथील मकबा हाईट्स येथील त्यांच्या घरी नेण्यात आला, जिथे लोक संध्याकाळी सिद्दीकी यांना अंतिम श्रद्धांजली वाहण्यास सक्षम असतील.
रविवारी रात्री 8.30 वाजता नमाज-ए-ईशानंतर मरीन लाइन्स भागातील बडा कब्रिस्तान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येण्याचे एका अधिकाऱ्यांनी सांगितले.
webdunia
Publish Date: Sun, 13 Oct 2024 (14:50 IST)
Updated Date: Sun, 13 Oct 2024 (14:54 IST)