Festival Posters

खेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही- अमोल कोल्हे

Webdunia
सोमवार, 14 जून 2021 (08:03 IST)
खेड तालुक्यातील प्रास्तावित रेल्वे आणि रिंगरोड हे दोन्ही प्रकल्प आहेत. ठिकठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. यासाठी रेल्वे बाधित शेतकऱ्यांच्या समस्या आणि भावना जाणून घेण्यासाठी खासदार कोल्हे राजगुरूनगर येथे आले होते. यावेळी बोलताना अमोल कोल्हेंनी शेतकऱ्यांना शब्द दिला आहे.
 
रेल्वे प्रकल्प आणि रिंग रोड अंमलात येणं गरजेचं आहे. मात्र शेतकऱ्यांच्या जमिनींबाबत समाधानकारक तोडगा काढूनच हा प्रकल्प कार्यान्वित करण्यास प्राधान्य राहील. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरवा करणार असुन शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
 
खेडमध्ये होणारं विमानतळ रद्द झाल्याने खेड तालुक्याचं मोठं नुकसान झालं आहे. पण पुणे नाशिक रेल्वेमुळे हा मतदार संघ थेट उत्तर आणि दक्षिण भारताशी जोडला जाणार असल्याने विकासाला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे तो अंमलात येणं गरजेचं असल्याचं कोल्हे म्हणाले. दरम्यान, शेतकऱ्यांना न्याय देण्याचीच शासनाची भूमिका राहील. रेल्वेमार्ग बाधित शेतकऱ्यांना जमिनीची किंमत वाटाघाटींद्वारे ठरवली जाणार आहे. ही बाब शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे. रेल्वे आणि रिंग रोड या दोन्ही प्रकल्पांनी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद करण्याचे प्रयत्न करणार आहे, असं अमोल कोल्हेंनी सांगितलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

प्रज्ञानंदाचा उल्लेखनीय पराक्रम, FIDE सर्किट जिंकून २०२६ कॅंडिडेट स्पर्धेत स्थान मिळवले

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन

International Anti Corruption Day 2025 आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस संपूर्ण माहिती

महायुती आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकत्रितपणे लढवेल-उपमुख्यमंत्री शिंदे

शिवसेनेचे २२ आमदार भाजपमध्ये सामील होणार! आदित्य ठाकरेंच्या दाव्याने महाराष्ट्रात राजकीय गोंधळ

पुढील लेख
Show comments