Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जे कामगार सोमवारपर्यंत कामावर येतील, त्यांचं निलंबन मागे घेऊ : परब

जे कामगार सोमवारपर्यंत कामावर येतील, त्यांचं निलंबन मागे घेऊ : परब
, शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (15:08 IST)
संपकरी असलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्याना राज्य सरकारकडून शेवटचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली आहे.
 
अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेऊन एसटी संपाबाबत राज्य सरकारची नेमकी भूमिका स्पष्ट केली. “महाराष्ट्रातल्या सगळ्या डीसींशी बोललो. त्यांच्याकडे कर्मचारी जाऊन सांगतायत की आम्हाला कामावर यायचंय पण काही लोकांकडून कामावर येऊ दिलं जात नाहीये. काही सांगतायत, आम्ही निलंबित आहोत म्हणून कामावर जाता येत नाहीये. त्यामुळे सगळ्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की एक संधी दिली पाहिजे”, असं अनिल परब यांनी सांगितलं.
 
आम्ही निर्णय घेतलाय, की जे कामगार सोमवारपर्यंत कामावर येतील, त्यांचं निलंबन मागे घेऊ. जिथे डेपो ५० टक्क्यांपेक्षा जास्त चालू होईल, त्यांना त्याच डेपोमध्ये काम दिलं जाईल. पण जिथे तेवढी कामगार संख्या नाही होणार, त्यांना आजूबाजूच्या डेपोमध्ये सामावून घेतलं जाईल”, असं अनिल परब म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

परभणी-मनमाड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला रेल्वे मंत्रालयाचा रेड सिग्नल