Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घराबाहेर न पडतासुद्धा देशातील सर्वोत्तम पाच मुख्यमंत्र्यांत नाव का आलं माझं?

uddhav thackeray
, गुरूवार, 28 जुलै 2022 (21:24 IST)
एक मिनिट… घराबाहेर न पडतासुद्धा देशातल्या सर्वोत्तम पाच मुख्यमंत्र्यांत नाव का आलं माझं? कारण त्यावेळेला ती परिस्थितीच तशी होती. मी स्वतः सांगत होतो घराबाहेर पडू नका आणि ते लोक ऐकत होते. मी जर का तेव्हा घराबाहेर पडलो असतो किंवा आजही पडलो तरी शिवसेनाप्रमुखांच्या, माझ्या पूर्वजांच्या आशीर्वादामुळे गर्दी होतेच. म्हणजे मग काय झालं असतं की, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.  शिवसेना नेते आणि खासदार तसेच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत  यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी सद्य राजकीय घडामोडींवर रोखठोकपणे भाष्य केले.
 
दरम्यान, माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला मी त्यांच्या कुटुंबातला वाटतो, असं भाग्य फार क्वचित कोणाच्या नशिबी येतं. मला नाही वाटत ते यांच्या नशिबी आलं असेल, कारण यांना काही पदं आता मिळाली तरी अजूनही ‘हम तुम दोनो, एक कमरे मे बंद हो’असे यांचे मंत्रिमंडळ आहे. त्याचा विस्तार कधी होणार आहे माहिती नाही. पण हे कितीही मंत्रीबिंत्री झाले तरी त्यांच्या कपाळावर जो विश्वासघाताचा शिक्का बसला आहे तो पुसता येणार नाही, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्य सरकारकडून विविध पुरस्कारांची घोषणा; या मान्यवरांचा होणार सन्मान