Publish Date: Mon, 30 Mar 2026 (17:19 IST)
Updated Date: Mon, 30 Mar 2026 (17:21 IST)
भारतीय हवामान विभागाने (IMD) ३० मार्च २०२६ रोजी मध्य महाराष्ट्रात गारपिटीसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात यलो अलर्ट आणि सूचना जारी करण्यात आल्या आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात तीव्र इशारा जारी केला आहे. पुढील ४८ तासांत मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस आणि गारपिटीची दाट शक्यता आहे. हवामानातील या अचानक बदलामुळे प्रशासन आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, कारण मार्च महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. तसेच हवामान विभागाने नागरिकांना या काळात सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आणि वीज पडण्यापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे हा ऋतू बदल होत आहे. मध्य महाराष्ट्रात, तसेच मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. पुणे, नाशिक, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा सर्वाधिक प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
रबी पिकांची काढणी आणि आंब्याच्या उत्पादनासाठी हा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. गारपिटीमुळे द्राक्षे, आंबा आणि धान्य पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना त्यांची काढणी केलेली पिके तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा सल्ला दिला आहे. उघड्यावर साठवलेले धान्य ताडपत्रीने झाकून ठेवण्याचे आणि जनावरांना सुरक्षित निवाऱ्याखाली ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
हवामान विभागाने पर्यटकांना पुढील तीन दिवस डोंगराळ भागात प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Edited By- Dhanashri Naik