महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिम यांच्यातील कॉलप्रकरण हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा भंग केल्याप्रकारणी एकनाथ खडसेंना राज्याच्या मंत्रिमंडळातून बरखास्त करावं, अशी मागणी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
खडसेंच्या मुद्द्यावरुन पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप सरकारवर तोफ डागली. राज्य सरकारचा गलथान कारभार सुरु आहे. खडसे-दाऊद कॉलप्रकरण अतिशय गंभीर आहे. त्यांचा राजीनामा घेऊन, मंत्रिमंडळातून बरखास्त करा, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.