ज्येष्ठ काँग्रसेचे नेते गुरुदास कामत यांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे. काँग्रेसच्या सर्व पदांसह त्यांनी सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.
मुंबईत महापालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्याआधीच गुरुदास कामत यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानं राजकारणातून संन्यास घेतल्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढू शकते.
सोनिया गांधींना भेटून निवृत्तीचा विचार बोलून दाखवला. त्यानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाही पत्र पाठवून निवृत्तीबद्दल माहिती दिली.
मात्र त्यांच्याकडून कुठलंही उत्तर आलं नाही. त्यानंतर मी काँग्रेस आणि राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे, असं कामत यांनी दिलेल्या निवदेनात म्हटलं आहे.