Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नववी, अकरावीच्या परीक्षा बोर्डाकडून नाहीत

नववी, अकरावीच्या परीक्षा बोर्डाकडून नाहीत
पुणे , सोमवार, 20 जून 2016 (10:52 IST)
नववी आणि अकरावीसाठी बोर्डाच्या प्रश्नपत्रिका नसून, या परीक्षा आधी सुरु असलेल्या पद्धतीनेच होतील, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.

राज्यात सध्या दहावी आणि बारावी या बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जात असताना, आता नववी आणि अकरावी या दोन वर्षांसाठी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांनुसार परीक्षा घेण्याचा विचार सरकार दरबारी केला जात आहे.

बोर्डाच्या परीक्षेची तोंडओळख व्हावी, या हेतूने हा निर्णय घेतला जात असल्याचीही चर्चा सुरु आहे. मात्र, या केवळ चर्चा असतानाही शैक्षणिक वर्तुळातून मोठ्या प्रमाणात विरोध सुरु झाला. त्यानंतर तावडेंनी स्पष्ट करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

नववी आणि अकरावीच्या परीक्षा बोर्डाकडून होणार नाहीत, असे स्पष्टीकरण तावडे यांनी दिले. आता ज्या पद्धतीने नववी, अकरावीच्या परीक्षा होत आहेत, त्याच पद्धतीने यापुढेही होतील, असेही ते म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चीन पाडणार मराठवाड्यात पाऊस