Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पावन खिंडीत तारांना लटकून लग्न!

पावन खिंडीत तारांना लटकून लग्न!
कोल्हापूर , सोमवार, 1 ऑगस्ट 2016 (10:39 IST)
कोल्हापूरचा गिर्यारोहक जयदीप जाधव आणि पाडळीची रेश्मा पाटील या दोघांनी अभिनव पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि बाजीप्रभूंनी लढवलेल्या पावन खिंडीत तारांना लटकून लग्न केल. गिर्यारोहणाला चालना देण्यासाठी आणि संसाराची सुरवात थरारक करण्यासाठीच या दोघांनी असं अभिनव लग्न केल्याची प्रतिक्रिया नवदाम्पत्याने दिली.
 
जखलाईचा कडा याठिकाणी दोन दिवसांपासून तयारी करण्यात आली.  भटजी बुवाही कमरेला पट्टा बांधून दाम्पत्यासोबत सुमारे हजार फूट खोल दरीच्या मधोमध लटकत होते. सुमारे शंभर पाहुणे मंडळींनी दरीच्या किनाऱ्यावर उभे राहून नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद दिले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

2018 पर्यंत सर्व ग्रामपंचायती डिजिटल करणार