Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पूल दुर्घटनेला राज्य सरकार जबाबदार : राज ठाकरे

पूल दुर्घटनेला राज्य सरकार जबाबदार : राज ठाकरे
नाशिक , गुरूवार, 4 ऑगस्ट 2016 (15:33 IST)
महाडमधील पूल दुर्घटनेला राज्य सरकार जबाबदार असल्याचा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

फडणवीस अजून विरोधीपक्षांच्या भूमिकेतून बाहेर आलेले नाही, सत्ता हातात आहे तर विदर्भाचा अनुशेष भरुन काढा, राज्यातल्या इतर समस्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी विदर्भाचा मुद्दा काढतात, फक्त वेळकाढूपणा करण्यासाठी असे उद्योग करतात, अशी टीकाही त्यांनी केली. राज्य सरकार जनतेला मूर्ख बनवत आहेत, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप सर्व एकत्र आहेत या शब्दांत राज यांनी सरकारवर निशाणा साधला. ब्रिटीशांना काळजी आहे, मात्र फडणवीस सरकारला नाही, असा टोलाही राज यांनी लगावला. देशात माणसं मरण्याची किंमत राहिलेली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया महाड दुर्घटनेवर राज ठाकरेंनी दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दारूचे सेवन करून गाडी चालवली तर 10,000चा दंड