Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात उष्णतेची लाट

राज्यात उष्णतेची लाट
मुंबई , गुरूवार, 19 मे 2016 (11:45 IST)
राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे. अकोल्यात  विदर्भातील सर्वाधिक 47.1 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. हे गेल्या पाच वर्षांतील अकोल्यातील सर्वाधिक तापमान आहे. उन्हानं जीवाची काहिली होती आहे पण आणखी काही दिवस उन्हाचा हा कडाका असाच कायम राहणार असल्याचं सांगितलं जातं आहे.

आगामी दिवसांतही विदर्भाचा पारा चढताच राहणार असून पुढील 48 तासांत विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे तापमान 47 अंशाच्यावर पोहचेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. याशिवाय, नागपूरातही 44.1 तर धुळ्यात 45.6 इतक्या तापमानाची नोंद झाली. नागपूरमध्ये तिघांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मारुतीची स्वस्त ऑल्टो 800 फेसलिफ्ट लाँच, हे आहे फीचर्स