सत्यमेव जयते जलसंधारणाच्या वॉटर कप स्पर्धेत साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातल्या वेळू गावानं पहिला क्रमांक पटकावला आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमीर खान यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस समारंभ पार पडला. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस साताऱ्याच्या जायगाव आणि बीडच्या खापरटोन गावांमध्ये विभागून देण्यात आलं. बीडच्या राडीतांडा आणि अमरावतीच्या वाठोडा, या दोन गावांनी तिसरा क्रमांक पटकावला.
दरम्यान स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचेलेल्या इतर गावांना दिलासा फाऊंडेशनतर्फे प्रत्येकी तीन लाखांचं बक्षीस देण्यात आलं. पाणी फाऊंडेशननं महाराष्ट्रातल्या तीन तालुक्यात ही स्पर्धा घेतली होती. ज्यात
116 गाव सहभागी झाली होती.