देश केवळ जाहीरातबाजीवर चालणार नाही, भविष्यकाळात शिवसेनेची एकहाती सत्ता येणार आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला सूचक सल्ला दिला आहे.
उद्धव ठाकरेंनी आजच्या मुलाखतीत म्हटलं आहे की, निवडणुका तर आम्ही आता लढणारच आहोत. बिहारात लढलो. उत्तर प्रदेश आणि गोव्यातही शिवसेना एका मजबुतीने उतरली आहे. देशाच्या राजकारणावर शिवसेनेच्या विचारांचा प्रभाव हा आहेच. त्याला एक राजकीय आकार देण्याचं काम सुरु असल्याचं उद्धव म्हणाले. बोले तैसा चाले असं वागणारा राज्यकर्ता अजूनपर्यंत देशाला लाभलेला नाही. शत-प्रतिशत वगैरे माहित नाही पण राज्यात शिवसेना स्वबळावर झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही असंही उद्धव म्हणाले.