माझा एक मित्र मला मिठाईच्या दुकानात भेटला, त्याने सांगितले की त्याच्या आईचे आज श्राद्ध आहे आणि तिला लाडू फार आवडतात म्हणून तो लाडू घ्यायला आला आहे. मी फार मोठ्या संकटात पडलो, कारण 5 मिनिट अगोदरच त्याची आई मला भाजी घेताना दिसली होती. मी काही बोलणार त्या आधीच त्याची आई भाजीची पिशवी घेऊन येताना दिसली. मी मित्राच्या पाठीवर एक दणकाच दिला आणि म्हटले हा काय प्रकार आहे? आईतर तुझ्या जवळच आहे! मित्र आईच्या खांद्यावर हात ठेवून हसून म्हणाला, आई मेल्यानंतर गाय-कावळ्याच्या ताटात लाडू ठेवण्यापेक्षा चांगले आहे की आईच्या थाळीत लाडू वाढून जिवंतपणीच तिला तृप्त करू. मला उमजले आहे की जिवंतपणीच आई-वडिलांना प्रत्येक परिस्थितीत सुखात ठेवणे हेच खरे श्राद्ध आहे.