Publish Date: Mon, 07 Sep 2020 (09:37 IST)
Updated Date: Mon, 07 Sep 2020 (09:39 IST)
श्राद्धाचा अर्थ श्रद्धेने आपल्या पितरांना प्रसन्न करणे आहे. सनातन मान्यतेनुसार जे नातलग किंवा नातेवाईक आपले देह सोडून गेले आहेत, त्यांचा आत्मेस सद्गती मिळण्यासाठी खऱ्या भक्तिभावाने केले जाणारे तर्पण श्राद्ध म्हणवले जाते. अशी आख्यायिका आहे की मृत्यूचे देव यमराज या पितृ पक्षात किंवा श्राद्ध पक्षात या जीवांना मुक्त करतात, जेणे करून ते आपल्या नातेवाईकांकडे जाऊन तर्पण ग्राह्य करू शकतील.
कोण असतात पितरं -
ज्या कोणाच्या कुटुंबात मग ते विवाहित असो किंवा अविवाहित, लहान मुलं असो किंवा वृद्ध, स्त्री असो किंवा पुरुष मरण पावले असल्यास त्यांना पितरं असे म्हणतात. पितृपक्षात मृत्यू लोकांतून पितरं पृथ्वी वर येतात आणि आपल्या कुटुंबियांना आशीर्वाद देतात. पितृपक्षात पितरांच्या आत्मेस शांती लाभावी म्हणून तर्पण केले जाते. पितरं प्रसन्न झाल्यास घराला सौख्य आणि शांतता लाभते.
पितृ पक्ष योग कधी येतो -
हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्व आहे. पितृपक्ष हे तब्बल 16 दिवस पितरांसाठी समर्पित असतो. शास्त्रानुसार श्राद्ध पक्ष हे भाद्रपदाच्या पौर्णिमे पासून सुरु होऊन भाद्रपद महिन्यातील अमावस्या पर्यंत चालतात. भाद्रपदाच्या पौर्णिमेस त्या लोकांचेच श्राद्ध केले जाते ज्यांची मृत्यू वर्षातील कोणत्याही पौर्णिमेला झाली असेल. शास्त्रात म्हटले आहे की वर्षातील पक्षाच्या कोणत्याही तिथीला कुटुंबीयांची मृत्यू झाली असल्यास त्यांचे पक्ष किंवा श्राद्धकर्म त्याच तिथीला करावं.
श्राद्ध पक्षाची तिथी आठवत नसल्यास -
पितृपक्षात पितरांची आठवण आणि त्यांची उपासना केल्याने त्यांच्या आत्मेस शांती लाभते. ज्या तिथीला कुटुंबीयांची मृत्यू होते त्याला श्राद्ध तिथी म्हणतात. बऱ्याचश्या लोकांना त्यांचा कुटुंबीयांची मृत्यू तिथी देखील आठवत नसते. अश्या परिस्थितीत शास्त्रात त्याचे निरसन देखील सांगितले आहेत.
शास्त्रानुसार एखाद्याला आपल्या पितरांच्या मृत्यूची तारीख किंवा तिथी माहित नसल्यास अश्या परिस्थितीत भाद्रपद अमावास्येला देखील तर्पण करू शकतात. या अमावस्येला सर्वपितृ मोक्ष अमावस्या देखील म्हणतात. या व्यतिरिक्त एखाद्याची अकाल मृत्यू झाली असल्यास त्यांचे श्राद्ध चतुर्दशी तिथीला करतात. अशी आख्यायिका आहे की वडिलांचे श्राद्ध अष्टमीला आणि आईचे श्राद्ध नवमी तिथीला करण्याची मान्यता आहे.