Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मैरीकॉमबाबत ट्विटने अमिताभवर जनप्रक्षोभ

मैरीकॉमबाबत ट्विटने अमिताभवर जनप्रक्षोभ
, बुधवार, 8 ऑगस्ट 2012 (16:27 IST)
बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी भारतीय महिला बॉक्सर मैरीकॉमच्या अभिनंदनसाठी केलेल्या ट्विटने मणिपूरमधील लोक नाराज झाले आहेत. मैरीकॉम मणिपूरची असताना त्यांनी नकळतपणे या ट्विटमध्ये ती आसामची असल्याचा उल्लेख केला होता.

त्यांनी लिहिले, मैरीकॉमने मुष्टीयुद्धाची लढत जिंकत कांस्य पदक सुनिश्चित केले आहे. दोन मुलांची आई असलेल्या आसामच्या मैरीने देशाची मान उंचावली आहे. येथे तथ्यात्मक चूक झाल्याने अमिताभ यांना चाहत्यांनी नाराजी ओढवून घ्यावी लागली.

PR
PR
अमिताभच्या ईशान्य भारताबाबतच्या अज्ञानावर टीका करणारा एक व्यक्ति लिहितो की, अमिताभ यांनी आपले भौगोलिक ज्ञानात भर घालावी. शिलॉंगची सामाजिक कार्यकर्ता अगनेश खरशिंग लिहितात की, हे लाजीरवाणे असून ईशान्य भारतास कधीपर्यंत पक्षपाती वागणूक मिळेल. इंफाळची दूरचित्रवाणी समालोचक वाट रूपचंद्र म्हणाली की, जर मणिपूर हे आसाम असेल तर मग मुंबई हे इलाहाबाद असायला पाहिजे.

या टिपण्यांनी अमिताभ त्रस्त झाल्यानंतर त्यांनी ‍ट्विट करून दिलगिरी व्यक्त करतानाच आपली चूकही सुधारली.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi