Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विश्वनाथन आनंद भारतरत्नचा हकदार: जयललीता

विश्वनाथन आनंद भारतरत्नचा हकदार: जयललीता
चेन्नई , बुधवार, 6 जून 2012 (10:13 IST)
PR
PR
पाचव्यांदा विश्व बुद्धीबळ विजेता ठरलेल्या विश्वनाथन आनंदला देशाचा सर्वौच्च नागरी पुरस्कार 'भारत रत्न' देण्याची मागणी करणार्‍यांमध्ये तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचा समावेश झाला आहे.

आपल्या निवासस्थानी सोमवारी आनंदला भारतरत्न देण्याच्या प्रश्नावर निश्चितच आनंद पुरस्काराचा हकदार असल्याचे उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी पाचव्यांदा जागतिक जेतेपद मिळविणार्‍या आनंदला दोन कोटींचे बक्षीस दिले आहे.

त्याने नुकतीच इज्राईलच्या बोरिस गेलफांदचा पराभव करत पाचव्यांदा विश्व बुद्धीबळ स्पर्धा जिंकली. यानंतर त्याला भारतरत्न देण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi