rashifal-2026

Badminton: श्रीकांत-सिंधू पुन्हा पराभूत, भारत सलग दुसऱ्यांदा सुदिरमन चषकाच्या गट फेरीतून बाहेर

Webdunia
बुधवार, 17 मे 2023 (07:21 IST)
स्टार शटलर किदाम्बी श्रीकांत आणि पीव्ही सिंधू यांना आपापल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला कारण सुदीरमन चषक स्पर्धेतील क गटातील दुसऱ्या सामन्यात भारत मलेशियाकडून 0-5 असा पराभूत झाला. एक दिवस अगोदर भारतीय संघाला चायनीज तैपेईविरुद्ध 1-4 असा पराभव स्वीकारावा लागला होता. मिश्र सांघिक चॅम्पियनशिपमध्ये भारताला सलग दुस-यांदा ग्रुप स्टेजमध्ये बाद व्हावे लागले
 
श्रीकांतला जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या ली जी जियाकडून 16-21, 11-21 ने पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारीत12व्या क्रमांकावर असलेल्या सिंधूला गोहकडून 21-14, 10-21, 20-22 असे पराभव पत्करावे लागले. ध्रुव कपिला आणि अश्विनी पोनप्पा यांनी 35 मिनिटांत गोह सून आणि लेई शेव्हॉन जेमी यांच्याकडून 21-16, 21-17 अशी मात केली. तीन सामने गमावून भारत बाद झाला.
 
महिला दुहेरीत गायत्री गोपीचंद आणि ट्रीसा जॉली यांचा 15-21, 13-21 असा पराभव झाला. या गटातील अव्वल दोन संघ म्हणून चायनीज तैपेई आणि मलेशिया यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारताला आता शेवटच्या गट सामन्यात ऑस्ट्रेलियाशी सामना करायचा आहे. सिंधू म्हणाली की हे खूप निराशाजनक आहे. तिसर्‍या गेममध्ये मी आठ गुणांनी पिछाडीवर होते  पण मी अंतर कमी करण्यात यशस्वी झाले आणि अखेरीस दोन गुणांनी पराभूत झाले . दुसऱ्या गेममध्ये माझ्याकडून चुका झाल्या. मी मारलेला प्रत्येक शॉट एकतर नेटमध्ये अडकत होता किंवा बाहेर पडत होता. तिसऱ्या गेममध्ये मला सुरुवातीपासूनच आघाडी घ्यायला हवी होती
 




Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे 1.06 कोटी रुपयांची फसवणूक

LIVE: पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

इंडिगो संकटावर भारतीय रेल्वेची मोठी घोषणा, अडकलेल्या प्रवाशांसाठी 84 विशेष गाड्या चालवणार

नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रभावित मार्गांसाठी कमाल भाडे मर्यादा निश्चित केली

पुढील लेख
Show comments