Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोदी सरकारचं बजेट हे नेहमीच आभासी आणि फसवं असतं अखासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया

मोदी सरकारचं बजेट हे नेहमीच आभासी आणि फसवं असतं अखासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया
, मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022 (15:18 IST)
“मोदी सरकारचं बजेट हे नेहमीच आभासी आणि फसवं असतं. त्यांच्या बजेटमध्ये सर्वसामान्यांसाठी काहीच नसतं. यंदाचं बजेटही तसंच आहे. या बजेटमध्ये सर्वसामान्यांसाठी काहीच नाही. गरीबांचा किती गळा किती आवळतात आणि देशातील दोनचार श्रीमंत आणखी किती श्रीमंत होत जातात ते, येत्या काळात पाहू,” असं संजय राऊत प्रतिक्रिया देताना म्हणाले.  
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. तब्बल दीड तास निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाचं वाचन केलं. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात महत्वाच्या घोषणा केल्या असून महिला, शेतकरी तसंच विद्यार्थ्यांचा उल्लेख केला आहे.  आरबीआयचं डिजिटल चलन येईल अशी घोषणा यावेळी त्यांनी केली. सोबतच संरक्षण क्षेत्र संशोधनासाठी खुल करण्यात आलं असल्याचं जाहीर केलं आहे. तर, या अर्थसंकल्पावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आगामी पंचवीस वर्षातील प्रगतीसाठी देशाला सज्ज करणारा अर्थसंकल्प भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील