Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'अमित शहांचा फोन उद्धव ठाकरेंना आलाच नाही'

'अमित शहांचा फोन उद्धव ठाकरेंना आलाच नाही'
मुंबई , सोमवार, 22 सप्टेंबर 2014 (17:14 IST)
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचे वृत्त खोटे असल्याचा खुलासा शिवसेनेने केला आहे. युती टिकविण्यासाठी अमित शहा यांनी उद्धव यांना फोन केल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शिवसेनेने या वृत्ताचा इन्कार केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव यांना असा कोणताही फोन आलाच नाही, असे म्हटले आहे.

मात्र, प्रदेशअध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी यापुढे शिवसेनेशी कोणतीही चर्चा होणार नाही, असा भाजपचा अंतिम निर्णय असल्याचे जाहीर केले. त्यामुळे युती तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी भाजप समोर 151-119-18चा प्रस्ताव पाठवला होता. भाजप स्विकारावा, यापेक्षा जास्त जागा देणे शक्य नाही. हा अंतिम प्रस्ताव असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवड समितीची बैठक झाली. या बैठकीत भाजप नेते जास्त जागांसाठी ठाम राहिलेत. निवडणून न आलेल्या 19 जागांबाबत विचार करण्यात यावा, अशी चर्चा बैठकीत झाली. त्याबाबत शिवसेनेला पुन्हा आवाहन करण्याची मोर्चे बांधणी झाली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi