Publish Date: Thu, 15 Nov 2018 (19:32 IST)
Updated Date: Thu, 15 Nov 2018 (15:39 IST)
अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी आहेत. हे दोघे बर्याच वर्षांनंतर रुपेरी पडावर एकत्र झळकणार आहेत. ते दोघेही तब्बल आठ वर्षांनंतर गुलाबजामू सिनेमात दिसणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला देखील सुरूवात केली आहे. या निमितताने नुकतीच एका वाहिनीला अभिषेकने मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने बॉलिवूडमध्ये कलाकारांना मिळणार्या मानधनाबद्दल आपले मत मांडले. अभिषेक बच्चनने मानधनाबद्दल सांगताना तो मानधनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहात असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, महिला अभिनेत्रींना अभिनेत्याच्या तुलनेत कमी मानधन मिळते. यावरून अनेकदा वाद होतात. पण मी याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. मी आणि ऐश्वर्या नऊ चित्रपटात काम केले. त्यापैकी आठ चित्रपटात माझ्यापेक्षाही अधिक मानधन हे ऐश्वर्याला मिळाले होते. पिकूमध्ये सर्वाधिक मानधन मिळालेली व्यक्ती दीपिका पदुकोण होती. बॉलिवूडमध्ये कलाकार किती यशस्वी आहे यावरुन त्याचे मानधन ठरते. जर नवोदित कलाकार शाहरुखइतकेच मानधन मागत असेल तर त्याला ते कसे मिळणार? ऐश्र्वर्या आणि अभिषेक ही जोडी अनुराग बसूच्या गुलाबजामून चित्रपटातून रुपेरी पडावर झळकणार असून त्यांची केमेस्ट्रिी पुन्हा एकदा चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे. या दोघांचे चाहते त्यांना एकत्र स्क्रीनवर पाहाण्यासाठी खूप उत्सुक आहेत.