Publish Date: Tue, 08 Mar 2022 (13:37 IST)
Updated Date: Fri, 30 Sep 2022 (21:54 IST)
'द कपिल शर्मा शो' हा कॉमेडी शो देशातच नाही तर परदेशातही चांगलाच लोकप्रिय आहे. या शोमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी येऊन त्यांच्या आगामी चित्रपटांचे प्रमोशन करतात, मात्र कपिल शर्माचा हा शो पुन्हा एकदा वादात सापडला आहे. 'द कश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी कपिल शर्मा आणि त्याच्या शोच्या निर्मात्यांवर असे आरोप केले आहेत, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
कपिलवर असे गंभीर आरोप
विवेक अग्निहोत्री यांनी सांगितले की, त्यांच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटात कोणताही मोठा स्टार नाही, त्यामुळे कपिलच्या शोमध्ये प्रमोशन करण्यास नकार देण्यात आला आहे. वास्तविक, एका यूजरने विवेकला ट्विटरवर टॅग करून विचारले, 'विवेक सर, कपिल शर्माच्या शोमध्ये या चित्रपटाचे प्रमोशन व्हायला हवे. तुम्ही सर्वाना सहकार्य केले आहे. कृपया या चित्रपटाचेही प्रमोशन करा. मिथुन दा अनुपम खेर यांना एकत्र बघायचे आहे. धन्यवाद!' या ट्विटला उत्तर देताना विवेक अग्निहोत्रीने लिहिले की, 'कपिल शर्मा शोमध्ये कोणाला आमंत्रित करावे हे मी ठरवू शकत नाही. हे पूर्णपणे कपिल शर्मा आणि त्याच्या निर्मात्यांवर अवलंबून आहे. जोपर्यंत बॉलीवूडचा संबंध आहे, एकदा मिस्टर बच्चन गांधी कुटुंबासाठी म्हणाले होते - 'वो राजा हैं हम रंक'.
'शोमध्ये आमंत्रित करण्यास नकार दिला'
यापूर्वी विवेक अग्निहोत्रीने एका ट्विटमध्ये सांगितले होते की, तो स्वत: कपिल शर्माच्या शोचा मोठा चाहता आहे पण त्याला या शोमध्ये आमंत्रित करण्यास नकार देण्यात आला आहे. त्यांनी लिहिले की, मी देखील त्यांचा चाहता आहे, पण वस्तुस्थिती अशी आहे की आमच्या चित्रपटात एकही मोठा स्टार नसल्याने त्यांनी आम्हाला त्यांच्या शोमध्ये आमंत्रित करण्यास नकार दिला आहे. बॉलीवूडमधील बिगर स्टार दिग्दर्शक, लेखक, चांगले अभिनेते यांना कोणी विचारत नाही. विवेकच्या या आरोपांनंतर अनेक युजर्सनी कपिल शर्माची खरडपट्टी काढली आणि त्याला ट्रोल केले.
हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे
विशेष म्हणजे विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून त्याला खूप पसंती मिळाली आहे. या चित्रपटाची कथा 90 च्या दशकात काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या याबद्दल सांगण्यात आले आहे. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, अनुपम खेर, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाईक यांसारख्या स्टार्सनी काम केले आहे. हा चित्रपट 11 मार्च 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.