Publish Date: Wed, 30 Jun 2021 (07:43 IST)
Updated Date: Wed, 30 Jun 2021 (07:44 IST)
फक्त लसीकरणामुळेच तिसरी लाट ठोपवता येईल. राज्यात 70 टक्के लसीकरण झाले तर तिसर्या. लाटेची दाहकता कमी जाणवेल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. टोपे पुढे म्हणाले की, राज्यात जास्तीत जास्त चाचण्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आरोग्य विभागाला नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.