Publish Date: Fri, 12 Oct 2018 (00:56 IST)
Updated Date: Thu, 11 Oct 2018 (16:47 IST)
आज कल लोक वजन कमी करण्याच्या चक्करमध्ये कोण कोणत्या डाइटचा वापर करत नाही. पण केळी खाऊन जर गरम पाणी प्यायले तर वजन कमी करण्यास मदत मिळेल.
या डाइटचे नाव मॉर्निंग बनाना ठेवण्यात आले आहे. जर तुम्ही असा विचार करत असाल की ही डाइट एवढ्या चांगल्या प्रकारे कशी काम करते, तर आम्ही सांगून देऊ की असे केल्याने शरीराचा मेटाबॉलिझम वाढून जातो आणि पचन क्रिया ही वाढते. केळीत एक प्रकारचा स्टार्च असतो, ज्यात ग्लायसेमिक इंडेक्सची मात्रा फारच कमी असते, ज्यामुळे हे पचण्यास फार जास्त वेळ घेतो आणि बर्याच वेळेपर्यंत पोट भरल्यासारखे वाटते. याने एनर्जीपण फार मिळते.
जे लोक या डाइटचे पालन करतात, त्यांना रात्री 8 वाजता डिनर करण्याचा सल्ला देण्यात येतो आणि डिनर नंतर गोड देखील नाही खायला पाहिजे. केळी नेमही ताजे असायला पाहिजे. मग पुढे तुम्हाला सांगू की कशी असायला पाहिजे तुमची डायट :
ब्रेकफास्ट
1 किंवा जास्त केळी (जोपर्यंत पोट भरत नाही)
1 ग्लास गरम पाणी
लंच
ताजे सलाडासोबत भोजन
भूक लागल्यावर 3च्या आधी काही गोड खाऊ शकता
डिनर
डिनरमध्ये भाज्यांनी भरपूर भोजन
गोड खाणे टाळावे
केळी खाताना गरम पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याची समस्या दूर होते. जे लोक असा विचार करतात की सकाळी उपाशी पोटी गार पाणी प्यायल्याने दिवसाची सुरुवात चांगली होते, तर असे नाही आहे. बलकी याने शरीराचे मेटाबॉलिझम हळू होतो आणि वजन कमी होणे थोडे अवघड होत.
तर मग आता जिम जाणे आणि बोरिंग डाइट करण्याची काळजी सोडा आणि अमलात आण ही बनाना डाइट आणि काही दिवसांमध्ये फरक पहा.