Publish Date: Thu, 11 Mar 2021 (08:35 IST)
Updated Date: Thu, 11 Mar 2021 (00:28 IST)
असे म्हणतात की लग्न झाल्यावर सर्व काही बदलते सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू असतो नंतर या वैवाहिक जीवनात काही खटके उडू लागतात आणि संबंध बिघडतात. असं होऊ नये या साठी काही टिप्स सांगत आहोत ज्यांना अवलंबवून आपण नातं सुधारू शकता. चला तर मग जाणून घेऊ या.
* गोष्टी सामायिक करा-
बऱ्याच वेळा असे दिसून येते की नवरा बायको एकमेकांशी सर्व गोष्टी सामायिक करत नाही.मतभेद झाल्यावर ते या गोष्टी बोलून दाखवतात. असं होऊ नये आपल्या सर्व्ह गोष्टी सामायिक करा. असं केल्याने नातं मजबूत राहील.
* एकमेकांना आदर द्या-
अशी म्हण आहे की टाळी कधीही एका हाताने वाजत नाही. नातं सुधारण्यासाठी पती-पत्नी दोघांनी एक मेकांचे आदर केले पाहिजे.
* विश्वास ठेवा-
बऱ्याच वेळा असे दिसून येत की नात्यात विश्वास नसतो,असं योग्य नाही पती पत्नीच्या नात्यात तर विश्वास असावा. शंका केली तर नात्यात दुरावा येऊ शकतो. म्हणून नात्यात विश्वास असणे महत्त्वाचे आहे.
* एक मेकांवर राग करू नका-
नातं भाऊ बहिणीचे असो किंवा पती-पत्नीचे नात्यात राग नसावे. बऱ्याच वेळा असे दिसून येते की मुलं अभ्यास करत नाही तर पती पत्नीवर रागावतात. पत्नी देखील पतीवर चिडते प्रयत्न करा की एकमेकांवर राग करू नका.