Publish Date: Sat, 07 Jan 2023 (09:12 IST)
Updated Date: Sat, 07 Jan 2023 (09:14 IST)
१. घरात सकाळी काही वेळेसाठी भजन अवश्य लावायला पाहिजे.
२. घरात कधीही झाडूला उभे नाही ठेवायला पाहिजे, त्याला पाय देखिल लावायचे नाही, आणि त्यावरून जायचे देखील नाही अन्यथा घरातील बरकत कमी होते. झाडू नेहमी लपवून ठेवावी.
३. बिस्तरावर बसून कधीही जेवण करू नये, असे केल्याने धनहानी होते. लक्ष्मी घरातून निघून जाते व घरातील वातावरण अशांत होत.
४. घरामध्ये जोडे चप्पल इकडे तिकडे फेकू नये किंवा उलटे सीधे ठेवू नये, असे केल्याने घरातील वातावरण तणावपूर्ण होऊन जात.
५. पूजा सकाळी 6 ते 8च्या दरम्यान केली पाहिजे व पूजा करताना तोंड पूर्व किंवा उत्तरेकडे असायला पाहिजे.
६. पहिली पोळी गायीला दिली पाहिजे. याने देवता प्रसन्न होतात आणि पितरांना शांती मिळते.
७. देवघरात नेहमी पाण्याचा कलश भरून ठेवावा.
८. आरती, दिवा, पूजा अग्नी सारखे पवित्रतेचे प्रतीक साधनांना तोंडाने फुंका मारून नाही विझवायला पाहिजे.
९. मंदिरात धूप, उदबत्ती व हवन कुंडाची सामग्री दक्षिण पूर्वांमध्ये ठेवायला पाहिजे, अर्थात आग्नेय कोणात.
१०. घराच्या मुख्य दाराच्या उजवीकडे स्वस्तिक बनवायला पाहिजे.
११. घरात कधीही जाळे लागू देऊ नये, नाहीतर भाग्य आणि कर्मावर देखील जाळे लागू लागतात आणि अडचणींना तोंड द्यावे लागते.
१२. आठवड्यातून एकवेळा नक्कीच समुद्री मिठाने पोछा लावायला पाहिजे. याने नकारात्मक ऊर्जा दूर होते.
१३. प्रयत्न करा की सकाळी सूर्य किरण तुमच्या देवघरात नक्की पोहोचली पाहिजे.
१४. देवघरात जर एखादी प्रतिष्ठित मूर्ती असेल तर त्याची रोज पूजा केली पाहिजे.