Publish Date: Wed, 16 Apr 2025 (11:59 IST)
Updated Date: Wed, 16 Apr 2025 (12:08 IST)
देशाच्या अनेक भागात पाणी टंचाई आणि उष्णतेचा सामना नागरिकांना करावे लागत आहे. भारतीय हवामान विभागाने मान्सून 2025 बाबत चांगली बातमी दिली आहे. हवामान विभाग म्हणाले, या वर्षी देशभरात सामान्यांपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे.
हवामान खात्याने म्हटले आहे की यावर्षी देशात चांगला पाऊस पडेल कारण मान्सूनवर अल निनो (भारतीय मान्सूनवर एएल निनो प्रभाव) चा कोणताही धोका नाही.
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, मान्सून साधारणपणे 1 जून रोजी केरळच्या किनाऱ्यावर धडकतो आणि नंतर सात ते आठ दिवसांत महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात, विशेषतः मुंबईमध्ये पोहोचतो. सध्याची परिस्थिती लक्षात घेता, 2025 पर्यंत मान्सून वेळेवर येण्याची अपेक्षा आहे.
हवामान विभागानुसार, जूनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून मुंबईत दाखल होणार आहे. संपूर्ण कोकणात मान्सूनचा पाऊस सुरु होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.
हवामान विभाग तज्ञ यांनी दिलेल्या माहितीनुसार, जून ते सप्टेंबर या चार महिन्यांचा मान्सून हंगामात भारतात यंदा सामान्यांपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आयएमडीचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. या कालावधीत एकूण पाऊस 87 सेमीच्या दीर्घकालीन सरासरीच्या 105 टक्के जास्त असू शकतो.