Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बेसमेंट मध्ये भरलेल्या पाण्याने घेतला तीन जणांचा बळी, दिल्लीनंतर जयपूरमध्ये मोठा अपघात

jaipur rain
, गुरूवार, 1 ऑगस्ट 2024 (15:39 IST)
दिल्लीनंतर आता जयपूरमध्ये देखील पावसामुळे बेसमेंट मध्ये पाणी भरले. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झालेला आहे. सिविल डिफेंस आणि एसडीआरएफच्या टीम ने एका व्यक्तीला रेस्क्यू केले. 
 
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये रात्री उशिरापर्यंत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे एकच गोधळ उडाला. रस्त्यावर भरलेल्या पाण्यामुळे नागरिकांना वाहन चालवणे अशक्य होत होते. यादरम्यान विश्वकर्मा नगर स्थित एका बेसमेंट मध्ये पाणी भरल्याने तीन जणांचा मृत्यू झालेला आहे. 
 
त्रिवेणी नगरमध्ये मुसळधार पावसामुळे दोन माजली इमारत कोसळली. बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. जामडोली परिसरात लहान मुलांना घेऊन जाणारी शाळेची बस अचानक रस्ता ढासळल्याने फसली. जेसीबीच्या मदतीने बस ला काढण्यात आले. 
 
मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी भरल्यामुळे अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहे. जयपुर एयरपोर्टवर पाणी भरले आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्वप्नील कुसाळेला कांस्य पदक, गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेना