Publish Date: Fri, 18 Nov 2016 (10:37 IST)
Updated Date: Fri, 18 Nov 2016 (10:39 IST)
राष्ट्रीय महामार्गांवरील टोलमाफी २४ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.याबाबत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट केले आहे. याआधी १८ नोव्हेंबरपर्यंत टोलवसुली बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. आता यामध्ये वाढ करण्यात आली आहे. चलनातून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर टोलनाक्यांवर सुट्टे पैसे उपलब्ध नसल्यामुळे टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे.