Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

युती झाल्यानंतरही जे पटणार नाही त्याला विरोधच - आदित्य ठाकरे

युती झाल्यानंतरही जे पटणार नाही त्याला विरोधच - आदित्य ठाकरे
, सोमवार, 8 एप्रिल 2019 (10:27 IST)
कर्जमाफी, नाणार प्रकल्प या संदर्भात उत्तरं मिळाल्यामुळे भाजपशी पुन्हा युती करण्यात आली. परंतू युती झाल्यानंतरही जे पटणार नाही त्याला विरोध करण्यात येईल, असं युवासेनेचे प्रमुख आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे रविवारी एका कार्यक्रमात म्हणाले.
 
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक मतदारसंघातील युवकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी आदित्य संवाद नावाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी एकमेकांशी कायम भांडत राहिलात तरीही युती का केली असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
webdunia
देशाची सध्याची परिस्थिती पाहता सध्या युती करणं गरजेचं होतं. पण नोटाबंदीच्या निर्णयामुळे कुणाचाच फायदा झाला नाही, असंही ते म्हणाले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारत आणखी एका हल्ल्याच्या तयारीत’: पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळून लावला