Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिहारमध्ये एनडीएचा विजय झाला असला तरी तो आम्ही मानत नाही -प्रकाश आंबेडकर

बिहारमध्ये एनडीएचा विजय झाला असला तरी तो आम्ही मानत नाही -प्रकाश आंबेडकर
, गुरूवार, 12 नोव्हेंबर 2020 (15:16 IST)
बिहारच्या निवडणूक निकालानंतर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी हा विजय आम्हाला मान्य नसल्याचं म्हटलं आहे.  
 
बिहारमध्ये एनडीएचा विजय झाला असला तरी तो आम्ही मानत नाही, असे म्हणत ईव्हीएमच्या मुद्द्यावरुनही प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे.
 
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला थोडक्यात बहुमत मिळाले आहे. 125 जागा जिंकत बिहारच्या मैदानात नितीश कुमार यांचा जेडीयू, भाजप आणि मित्रपक्षांच्या युतीने बाजी मारली आहे, असे असले तरी आपण हा एनडीएचा विजय मानत नाही असं आंबेडकरांनी म्हटलं आहे.
 
"बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान फायदा करुन घेण्यासाठी भाजपचा बिहारमध्ये दंगली घडवण्याचा डाव होता. पण भाजपचा हा डाव आम्ही पूर्णत्वास जाऊ दिला नाही," असा गंभीर आरोपही आंबेडकर यांनी केला आहेत. तसेच, ईव्हीएम मशिनच्या मतदानावर लोकांचा विश्वास नाही. निवडणुका ह्या बॅलट पेपरवरच घ्यायला हव्यात, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना दिवाळीः मास्क लावला की कोरोनापासून 100 टक्के संरक्षण होतं का?